मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : मौजे पेवा ते तांडा वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मंगळवार ता. 24 पासून तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तहसीलदार सुमन मोरे यांचे लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंठा तालुक्यातील मौजे पेवा ते तांडा रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे अरुंद झाला होता तांड्यातील ग्रामस्थांनी हा रस्ता स्वखर्चाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला मात्र पांदण रस्त्याच्या लगत असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण करून रस्ता करण्यास विरोध केला त्यामुळे तांड्यातील नागरिकांना महिला व विद्यार्थ्यांना रस्त्याची मोठी अडचण निर्माण झाली होती हा रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी शेकडो महिला व ग्रामस्थांनी मंगळवार ता 24 पासून उपोषण सुरू केले होते. तहसीलदार सुमन मोरे, पोलीस निरीक्षक विलास निकम ,वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय चव्हाण, मानव मुक्ती मिशनचे पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने तहसीलदार सुमन मोरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. उपोषणकर्त्यांना मध्ये दामोदर वाणी ,सुरेश गव्हाणे, ब्रह्मानंद पवार, रमेश राठोड ,मदन राठोड, पंडित चव्हाण, सखाराम मोरे,रफीक भाई, रामेश्वर पवार ,मांगीलाल राठोड ,भुजंग राठोड, रामेश्वर राठोड, साहेब राठोड, संतोष राठोड ,भाऊ चव्हाण, गजानन जाधव ,रामप्रसाद नरवाडे, दगडू नरवाडे ,अशोक चव्हाण, रावसाहेब नरवाडे, अंकुश राठोड ,सुभाष नरवाडे, विलास राठोड यांच्यासह ग्रामस्थ आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता
गावे आणि तांड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी संघर्ष करणार ......संजय चव्हाण परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे आणि तांड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रस्त्यांचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे गावे आणि तांड्यातील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना रस्ता नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे .भविष्यामध्ये मंठा तालुका तसेच नेर शेवली भागातील गाव व तांडे आणि परतूर तालुक्यातील रस्त्यापासून काही वंचित राहिलेल्या गावातील रस्त्यासाठी संघर्ष करणार असे वंचित बहुजन आघाडीचे परतूर विधानसभा मतदार संघाचे नेते संजय चव्हाण यांनी सांगितले
No comments:
Post a Comment