Tuesday, 31 December 2019

प्रा.नारायण दुभळकर यांना पीएचडी

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा.नारायण दुभळकर सर यांना डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठांनी पदवी प्रदान केली आहे. इंग्रजी विषयात (Resistance and Representation in Doris Lessing Fiction)हा विषय घेवून डॉ.व्ही.एम.रासुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पुर्ण करूण पी.एच.डी
प्राप्त केली.नारायण दुभळकर सर यांनी मंठा तालुक्यातून आदिवासी समाजातून प्रथमच पी.एच.डी मिळवली आहे. आपार मेहनत व जिद्दीने त्यांनी ऊच्च शिक्षण घेवुन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.त्यानिमित्य महाविद्यालयामध्ये प्रा.डॉ.नारायण दुभळकर सर यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ.भारत खंदारे,उप.प्राचार्य प्रा.अशोक खरात ,पर्यवेक्षक प्रा.डि.आर जाधव ,जेष्ट प्रा.सोन्याबापू चव्हाण व सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग हजर होते.व तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अशाताई आकात ,कपिल भैया आकात ,कुणाल दादा आकात प्रा.शेळके सर,प्रा.आघावसर,प्रां काकडे सर,प्रा.पाटील मॅडम,प्रा राऊत सर, प्रा. बांडगे सर,प्रा.कादे सर,प्रा.पंढरीनाथ काकडे प्रा. शिंदे सर,प्रा.मगर सर यांनीही प्रा.डॉ. दुभळकर सरांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Monday, 30 December 2019

बाबूजी तिवारींचा सपत्नीक सत्कार...

नवयुवक नाट्य मंडळ औंढा नागनाथचा अविस्मरणीय उपक्रम

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:जेष्ठ पत्रकार बाबूजी तिवारी यांच्या उत्कृष्ठ नाट्य दिग्दर्शनाने घडलेल्या नाट्य कलावंतांनी दि 22 डिसें रविवार रोजी सर्व नाट्य कलावंत व नागरिकांच्या उपस्थितीत  तिवारी यांचा सपत्नीक  ह्रद्य सत्कार केला व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती तेजकुमारजी झांजरी प्रमुख अतिथी प्रसिद्ध नाटककार व लेखक विनोदजी डावरे औरंगाबादचे डॉ अग्रवालजी जेष्ठ भाजप नेते पांडुरंगजी पाटील आदि होते. सर्व प्रथम अभिनय सम्राट डॉ श्रीराम लागू यांना आदरांजली अर्पण करून दीप प्रज्वलन केले स्वागत गीत नंतर उपस्थितांचे हस्ते सत्कार मूर्ती बाबूजींना सपत्नीक
शाल श्रीफल सन्मान चिन्ह व सन्मान पत्र  देऊन गौरवांवित करण्यात आले तसेच  सुश्री ज्योती जोशी यांनी सन्मान पत्राचे वाचन करून बाबूजींना प्रदान करण्यात आले.प्रास्ताविकात गणपत सोनुने यांनीं नाट्य मंडळाची निर्मिती, यशस्वी नाटके, त्यातील विशिष्ट प्रसंग, आलेल्या अडचणी आणि सरांची दिग्दर्शन शैली आदींची विस्तृत माहिती दिली तर नाट्य कलावंतांनी नाटकातील संवाद व प्रसंग हुबेहूब प्रस्तुत करून जुन्या आठवणींना उजाळा दिला स्त्री भूमिका साकारणाऱ्या तान्हाजी मुंदळे पवन झांजरी, वजीरभाई आदिंनी सर्वात कठीण असलेली भूमिका ही स्त्री पात्राची असते आणि पुरुषाने स्त्री साकारणे, मुद्राभिनय हावभाव हे फारच अवघड होते पण तिवारी सरांनी आम्हास वेळोवेळी मार्गदर्शन करून मनातील भीती दडपण नाहीसे केले म्हणूनच आमच्या भूमिका चिर स्मरणीय ठरल्या असे सांगितले  या प्रसंगी मनोहर पायघन यांनी १०१ नाटकाच्या शिर्षकांचा समन्वय साधून मनोगत व्यक्त केले तर चंद्रकांत  तम्मेवार यांनी लाडिक संवादाचे वेळी सरांनी श्रीमुखात कशी भडकावली हे सांगून श्रोत्यांच्या टाळ्या मिळविल्या प्रमुख अतिथी नाटककार डावरे यांनी अभिनयाचे बारकावे उच्चार आणि हावभाव या बद्दल महत्वाची माहिती दिली तसेच उपस्थित कलावंतांचे भरभरून कौतुक केले पांडुरंग पाटील यांनी नवयुवक मंडळाने स्थापिलेल्या ज्ञानदीप वाचनालय व उत्तरोत्तर झालेली प्रगती सांगून यापुढेही सहकार्याचे वचन दिले याशिवाय  अनेकांनी सरांच्या वेगवेगळ्या कलागुणांचा अध्यापन पद्धतीचा आणि शिस्तीचा उल्लेख केला.सत्काराला उत्तर देत तिवारी यांनी मनोरंजनाचे व प्रबोधनाचे ग्रामीण भागातील एकमेव माध्यम नाटक असल्याचे सांगितले  नाटकात संवाद  पाठांतर पूर्ण पक्के असेल तर अभिनय करणे सोपे होते आणि या कलावंतांनी यात १००% यश मिळविले असे सांगून १९७० च्या काळात नाटकासाठी शेंडी पासून तयारी करणे अवघड होते पण औंढावासीयांनी सर्वेपरी मदत केली कलावंतांनी अहं विसरून कामे केली मी दाखविलेल्या चुका दुरुस्त केल्या म्हणून या मंडळाची  नाटके यशस्वी झालीत असे सांगितले तत्कालीन सरपंच माणिकराव देशमुख ध्वनी क्षेपक विनामूल्य देणारे लिंबाजी वानखेडे ,सुरेश वैद्य ,राजाभाऊ देशपांडे, संगीत साथ देणारे माताडे ,खुळखुळे, कुलकर्णी, लांबडे दत्ता गुरू लक्ष्मणाप्पा डोंगरे बाबुराव जवादे आदिंचा आवर्जून उल्लेख केला.आपल्या अध्यक्षीय समारोपात झांजरी यांनी ,पूर्वी पासून अध्यक्ष पदाची जबाबदारी सर्वांच्या सहकार्यामुळेच सांभाळता आल्याचे सांगून कलोपासना वृत्ती, बालपणाचे हे चांगले मित्र आणि विधायक कामासाठी सर्वाचा आग्रह ,आवड जिद्द यामुळे चिमुकल्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर होत असल्याचे सांगितले तसेच या व अशा सर्व यशस्वी कार्यक्रमाचे परिपूर्ण नियोजन अथ:पासून इति:ची एकमेव मेहनत गणपत सोनुने यांनी केल्याचा विशेष साभार उल्लेख अध्यक्षांनी केला.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन व आभार प्रदर्शन पांडित्य शिरोमणी,वाक् चतुर निळकंठ देव यांनी केले.कार्यक्रमास शहरातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातून प्रतिभावंत खेळाडू तयार होतात..... पो.नि.विलास निकम

खेळाने सांघिक भावना निर्माण होऊन एकोपा वृध्दींगत होतो.... संचालक वैजनाथ बोराडे

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी :ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतात , त्यासाठी अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजेत असे विचार पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी उदघाटन समारंभा प्रसंगी मांडले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ बोराडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त [ता.२९] रविवार रोजी नगरसेवक सचिन बोराडे यांनी आयोजित केलेल्या मंठा प्रमियर लीगच्या किक्रेट सामान्यांच्या
उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे,अमोल मोरे,दिनेश बोराडे,दिपक बोराडे,सरपंच माऊली गोंडगे, विनायक चव्हाळ,सतिश बोराडे,रहीम पठाण, महादेव खरात,उबेद भाईजी,राजेश बोराडे , केशव बोराडे,इम्रान पठाण,कय्युम कुरेशी व शेख परवेज यांच्यासह आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीस संचालक वैजनाथ बोराडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पुढे बोलतांना पोलीस निरीक्षक विलास निकम म्हणाले कि ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतात,ग्रामीण भागातून आत्तापर्यंत प्रतिभावंत खेळाडू तयार झाले असल्याचे शेवटी बोलतांना सांगितले.तसेच वाढदिवसानिमित्ताने ठेवलेल्या या सामन्याला उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात संचालक वैजनाथ बोराडे म्हणाले की खेळाने सांघिक भावना निर्माण होऊन एकोपा वृध्दींगत होऊन इतर गुणांचाही विकास होत असतो. त्यामुळे आपले सुप्त गुणही विकसित होत असतात.खिलाडी वृत्ती, सांघिक वृत्ती, सहकार्य करण्याची वृत्ती, नेतृत्व, स्पर्धात्मक वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास या गुणांचा नियमित खेळामुळे विकास होतो. त्याकरिता मानवाला व्यायाम हा खूप आवश्यक आहे. त्याक डे दुर्लक्ष केले तर विविध प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते.त्याकरिता क्रिकेट बरोबर अन्य मैदानी खेळही खेळणे आवश्यक  असल्याचे यावेळी बोराडे यांनी सांगितले.याप्रसंगी सचिन चव्हाळ,मोहसीन मिस्बा,अंजर शेख,साजिद बागवान,शेख इम्रान,सय्यद तोफिक,मुक्तदिर बागवान, रवि काळे,तान्हाजी मोरे,अजिंक्य गोरे,शेख शमीम, शेख रयाज,जुनेद पठाण,राजु चव्हाण, तोफीक पठाण,शेख इल्लु,एहसान शेख,अमोल चव्हाळ , कृष्णा वाघ,यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू व किक्रेटप्रेमी उपस्थित होते.या किक्रेट सामान्यांसाठी स्मारक समितीचे अध्यक्ष सचिन बोराडे यांनी प्रथम पारितोषिक २२ हजार २२२ , बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे यांच्याकडुन द्वितीय १७ हजार १११ , अमोल मोरे तृतिय पारितोषिक यांनी १२ हजार २२२ रूपयांचे,चतुर्थ बक्षीस ११ हजार १११ रूपयांचेे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्याकडुन तर उत्कृष्ठ संघ म्हणुन निलेश जोजारे यांच्याकडुन ५ हजार ५५५ रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे...

मंठा पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा...

सभापतीपदी शिल्पा पवार उपसभापदी पदी नागेश घारे यांची बिनविरोध निवड

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष असून भारतीय जनता पार्टी मध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकतो सर्वसामान्य कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा प्राण आहे असल्याचे मत माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले यावेळी मंठा पंचायत समितीच्या सभापती पदी शिल्पा नरेंद्र पवार तर उपसभापतिपदी नागेश रामकिसन घारे यांची
बिनविरोध निवड करण्यात आली मंठा पंचायत समिती च्या सभापती व उपसभापती निवडीनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोणीकर बोलत होते यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल भैया लोणीकर माजी तालुकाध्यक्ष गणेशराव खवणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष  रामराव लावणीकर  माजी सभापती अंकुशराव बोराडे तालुका अध्यक्ष सतीश राव निर्वळ सभापती संदीप गोरे उपसभापती राजेश मोरे बीडी पवार दत्तराव कांगणे राजेश मस्के माऊली वायाळ सोमय्या स्वामी माजी सभापती सौ स्मिता मस्के  सौ  यमुना कांगणे  श्रीमती लक्ष्मीबाई स्वामी गटविकास अधिकारी  संजय पाटील  सहाय्यक गटविकास अधिकारी मेथे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.भारतीय जनता पार्टी कोणत्याही एका व्यक्तीच्या मनावर चालत नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून राष्ट्रीय पातळीवरच्या सर्वोच्च व्यक्तीपर्यंत पार्टी मध्ये केलेल्या कामानुसार सर्वांना स्थान दिले जाते सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा भारतीय जनता पार्टीचा नारा असून त्यानुसार निष्ठापूर्वक पक्षाचं काम करणाऱ्या सर्वसामान्य पक्षाचे काम करणार्‍या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पदावर बसण्याचा मान दिला आहे.सभापती आणि उपसभापती पदावर विराजमान झालेल्या नवनिर्वाचित यांना उद्देशून सल्ला देताना लोणीकर म्हणाले की पंचायत समितीच्या सभापती आणि सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या कामाला प्राधान्य द्यावे त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा यथोचित मानसन्मान झाला पाहिजे असे लोणीकर यांनी यावेळी सभापती उपसभापती यांना सांगितले सर्वसामान्यांची सेवा करून आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करावे असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले.मंठा पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकी दरम्यान सभापतीपदासाठी सौ शिल्पा नरेंद्र पवार व उपसभापती पदासाठी नागेश रामकिसन घारे यांचा एकच नामनिर्देशन पत्र आल्याने सभापती आणि उपसभापती पदाची निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी शिवसेनेचे दोन काँग्रेसचे एक तर भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य गैरहजर होता जयपुर पंचायत समिती गणाच्या सदस्य  शालनताई नाथराव काकडे  यांच्या अकाली निधनामुळे  एक जागा रिक्त होती मंठा पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होतेयावेळी उद्धव गोडगे प्रसादराव गडदे विलास घोडके नरसिंग राठोड निवास देशमुख नवनाथ देशमुख नवनाथ खंदारे महादेव बाहेकर सुभाष राठोड जिजाभाऊ झोल अशोकराव सोनटक्के अनिल खंदारे बाबाजी जाधव सूर्यकांत जाधव तानाजी शेंडगे हरिभाऊ जाधव अमोल नरेंद्र ताठे भगवान लहाने शंतनू काकडे कैलास नेवरे रामप्रसाद चव्हाण बाळासाहेब इंगळे दत्ता खराबे रमेश वायाळ गजानन फुपाटे गजानन शिंदे जितेंद्र सरकटे प्रल्हादराव सरकटे एकनाथ जाधव श्रीराम राठोड दीपक दवणे बळीराम दवणे सुभाष चव्हाण रामेश्वर चव्हाण कल्याण चव्हाण दत्ता उबाळे शिवाजी जंजिरे लतिष शिंदे गणेश राव चव्हाण विठ्ठल राव कदम दिगंबर अवचार राजूभाऊ खराबे नारायणराव बागल अरुण खराबे रमेश बादल अरुण खराबे संतोष बोराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Saturday, 21 December 2019

नागरिकत्व सुधारना कायद्याविरोधात मंठायात लोटला जनसमुदाय

निषेध रॅली:परिसरातील दुकाने बंद,घोषणाने  शहर दाणाणले.

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: इंकलाब जिंदाबाद,तानाशाही नही चलेंगी,मोदी सरकार हाय हाय,हिंदु-मुस्लिम भाई भाई,मोदी शाह मुर्दाबाद,सीएए बिल रद्द झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत हजारो हिन्दु-मुस्लिम बांधवांनी शनिवारी मंठा फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत विराट मोर्चा द्वारे केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला.नागरिकत्व सुधारणा विधयेक केंद्र शासनाने पारित केला यावेळी अनेक ठिकाणी शासनाच्या विरोधात निषेध रॅली काढण्यास सुरवात झाली दरमियान
याचे पडसाद मंठा शहरात उमटले आहेत.हिंदु-मुस्लिम बांधणी हाताला काळ्या पट्ट्या बांधून व हातात मोदी शाह फेक है, हिंदु-मुस्लिम एक है,इंकलाब जिंदाबाद मोदी सरकार मुर्दाबाद,सीएए बिल वापस लो,असे लिहिलेले फलक घेऊन हिंदू मुस्लिम युवक मोर्चेत सहभागी झाले होते मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी नगरसेवक शेख साजिद,नितिन सावंत अड.मधुकर मोरे,शगिर पठान,रियाज मुफ़्ती यांनी मोर्चेला संबोधित करतांना भाषणे केले यावेळी शगिर खान पठान बोलतांना सांगितले की केंद्र शासनाने पारित केलेला हा कायदा संविधान विरोधी असून मुस्लिम समाज या कायद्याला कधीही मान्य करणार नाही जोपर्यंत हा काद्या रद्द होणार नाही तोपर्यंत मुस्लिम समाज याला विरोध करणार आहे या सीएए विरोधात मुस्लिम समाज जागृत झाला असुन त्याला कडाडून विरोध करण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरणार आहे त्यामुळे केंद्र शासनाने याच वेळीच दखल घेऊन हा कायदा रद्द करावा असे निवेदन तहसीलदार सुमन मोरे व पोलीस उपविभागीय अधिकारी बांगर साहेबसह पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब यांना देण्यात आले यावेळी हाजी कय्यूम कुरेशी,हाजी मुसा कुरेशी,उपनगरध्यक्ष सिराज खान पठान,माजी जिल्हापरिषद सदस्य राजेश राठौड़,अड़ अधुकर मोरे, नगरसेवक शेख साजिद,इल्यास कुरेशी,मोईन कुरेशी,शेख साजिद,शबाब कुरेशी,इसाम पटेल,शेख एजाज़,कबीर तांबोली,हाजी इरफ़ान अली,शकील अंसारी,खलील पाशा अंसारी,इब्राहिम तांबोली,शेख रईस,राजेश खंदारे,भीमराव वाघ, इम्रान मनियार,इनुस कुरेशी,शेख अनस,साजिद पिंजारी,ताहेर बागवान,उबेद बागवान,अब्दुल्ला बागवान,इमरान खान,जब्बार मौलाना,आदिसह हजारोच्या संख्येने हिंदू-मुस्लीम युवक उपस्थित होते.

Saturday, 14 December 2019

गुरु अबॅकस अकॅडमीच्या यशाची परंपरा कायम..!नंदन चव्हाण औरंगाबाद विभागातून प्रथम

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:दि.-08/12/2019(रविवार) रोजी औरंगाबाद येथे प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित विभागीय खुली अबॅकस स्पर्धा संपन्न झाली.या अबॅकस स्पर्धेत औरंगाबाद विभागातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.या विभागीय स्पर्धेत गुरू अबॅकस अकॅडमी,मंठा.(ता.मंठा.जि. जालना) मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.ही परीक्षा भानुदासराव चव्हाण मेमोरिअल हॉल,रेल्वे स्टेशन रोड औरंगाबाद येथे दोन सत्रात पार
पडली.पहिल्या सत्रात परीक्षा घेण्यात आली तर दुसऱ्या सत्रात बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास सन्माननीय श्री.गिरीश करडे,श्री.अजय मणियार,श्री.राज लोचनी तसेच मराठवाडा समन्वयक श्री.जनार्धनजी पवार सर उपस्थित होते. या स्पर्धेत गुरु अबॅकस अकॅडमीतील नंदन आसाराम चव्हाण हा थर्ड लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून प्रथम आला तर शामल भरतराव बागल ही सेकंड लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून प्रथम आली.तसेच रेणुका दत्तराव बोराडे ही फोर्थ लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून द्वितीय तर आकांक्षा बालासाहेब बोराडे ही फर्स्ट लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून द्वितीय आली.तसेच वैष्णवी सुधाकरराव टकले ही फर्स्ट लेव्हल मधुन औरंगाबाद विभागातून बेस्ट-5 मध्ये आली आहे.या गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं सर्वच स्तरातुन गोड कौतुक होत आहे.या गुरु अबॅकस अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे गुरू अबॅकस अकॅडमी परिवाराचे श्री.गणेश गुंड सर,श्री.संतोष खुळे सर,श्री.दत्ता सहाणे सर,श्री.राहुल सरवदे सर तसेच प्रा.हेमंतराव निर्वळ सर,श्रीनिवास मोरे यांनी सत्कार करून त्यांचं अभिनंदन केले.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!

Friday, 13 December 2019

वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बिल रद्द करण्याची जमियत उलेमा-ए-हिन्दची मागणी...


सीएबीविरुद्ध तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन..

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी.देशातुन वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्धचे आंदोलन तीव्र झाले असून ठीक ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा उद्रेक पहावयास मिळत आहे.सीएबी नागरिकता संशोधन बिलाच्या विरोधात आज जमियते ऊलेमा हिंद शाखा मंठाच्या वतीने 13 डिसेंबर शुक्रवार रोजी शेकडो मुस्लीम बांधवांनी तहसीलदार सौ.सुमन मोरे मॅडम,व पोलीस निरीक्षक विलास निकम साहेब यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नागरिकता संशोधन बिल संविधानाच्या विरोधात आहे तो लवकरात लवकर रद्द करण्यात यावा.लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात नागरिक संशोधन बिल पारित करण्यात आले.
मात्र हे बिल भारतीय राज्य घटनेच्या धर्मनिरपेक्ष व्याख्याला मलिन करणारी आहे हे विधेयक अन्यायकारक असल्या कारणाने मुस्लिम समाजाच्या वतीने आज मंठा येथील मर्कज मस्जिद ते तहसील कार्यालय पर्यंत अतिशय शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढुन तहसीलदार सौ.सुमन मोरे यांना निवेदन देण्यात आले नागरिकता संशोधन विधायक पारित झाल्याने हे विधायक संप्रदायीक असून असे कायदे संपूर्ण देशासाठी घातक आहे.या विधेयकाला जमियत  उलेमा-ए-हिंद द्वारा वेळोवेळी विविध आंदोलने लोकशाही मार्गाने विरोध करण्यात येईल.हा विधेयक धर्माच्या नावाने भेदभाव करणारे आहे.याबाबत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवरून संघटने द्वारा येणाऱ्या निर्णयानुसार विरोध सुरूच राहील सीएबी संविधानाच्या मूळ भावनेला आणि संरचनेला पूर्णपणे बाधक आहे.असे प्रतिपादन यावेळी जमियते उलेमा-ए-हिंदच्या वतीने हाफेज शबाब बागवान यांनी केले.यावेळी मुफ्ती इरफान मिल्ली,मौलाना सलीम,हाफीज शबाब,हाफिज साकिब,हाफिज शाकेर, हाफिज युनुस, मौलाना अहमद,मौलाना रफिक,मौलाना हाजी बशीर मिल्ली , हाफिज वलीउल्लाह, हाफिज अब्बर, मौलाना साबीर, हाफिज सलीम, ईसामोद्दीन पटेल , प्रकाश अण्णा घुले,इलयास कुरेशी नगरसेवक, बाज खाँ साहब,सय्यद इरफान अली,शबाब कुरेशी,खालील पठाण,इब्राहिम तंबोली,सिद्दीक बागवान,रफिक शेख,भिमराव वाघ,शकील अन्सारी,रवी सदावर्ते, योगेश  सूर्यवंशी,राजेश खंदारे,रियाज बागवान, साजिद पिंजारी,इन्नु कुरेशी,शेख अनस,अलीम कुरेशी,अमजद कुरेशी,तोफिक अतार संदीप प्रधान,मोठिया संख्येने सर्व समाजातील बांधव उपस्थित होते.