200

Followers

Saturday, 2 November 2019

परतीच्या पाऊसाने झालेल्या नुकसानीची तत्काड भरपाई देण्याची युवक कॉंग्रेसची मागणी...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी:मंठा तालुक्यात परतीच्या पाऊसामुळे कढणीच्या आलेले शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.ज्यामध्ये कापूस,तुर,सोयाबीन,मुंग,मक्का,बाजरी यासह बाहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे.
शासनाचे आदेशीत केल्याप्रमाणे पंचनामे सुरु झाले आहेत परंतु त्यामध्ये केवळ सोयाबीन व मका याच पिकाचा समावेश करण्यात येत असल्याचे समजले आहे. मंठा तालुक्यात कापुस,तुर या पिकाचा मोठ्या प्रमाणात लागवड आहे.आणि प्रामख्याने तिच पिके वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्यासारखा पंचनामा व सर्व्हे होत आहे. यामध्ये मका व सोयाबीन या पिकाचा पेरा कमी आहे वास्तविक पाहता शेतात जी पिके उभी आहेत त्या सर्व पिकांचा समावेश पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.असे निवेदन युवक कॉंग्रेसच्या वतीने तहसील येथे पेशकार दवने सर यांना देण्यात आले तसेच याच मागणी करीता युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल देशमुख यांच्यावर दिनांक ३० ऑक्टोंबर 2019 रोजी भोकरदन येथे सादरील मागणी करीता करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे माघे घेण्यात यावे.अशी मागणी युवक कांग्रेसच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी बाळासाहेब वाजोळकर,सुरेश वाव्हळे,जफ़र पठान,रवि भांमळे,सतीष काळे,प्रदीप चोरमारे,जगन मोरे,बाळू गायकवाड़ आदि उपस्थित होते.



No comments:

Post a Comment