200

Followers

Monday, 21 May 2018

ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा ..पालक मंत्री बबनराव लोनिकर

मोसीन कुरेशी

मंठा, दि. 21 -  जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात येत आहे.  ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असुन विकासाची कामे करत असताना ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत, असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
मंठा तालुक्यातील विडोळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला.  त्याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर भूजंगराव गोरे ,  संदीप गोरे, अंकुशराव बोराडे, , गणेशराव खवणे, , शिवाजी आबा खंदारे, बाबुराव शहाणे, रामराव लोणीकर, राजेश मोरे, , प्रदीप बोराडे, पंजाबराव बोराडे, कल्याण खरात, संभाजी खरात, नागेशराव घारे ,कैलास बोरडे, प्रकाश टकले, सदाशिव निर्वळ, सुदाम प्रधान, विष्णु फपाटे, शिवदास हानवते,  नाथराव काकडे, गजानन देशमुख, अशोक वायाळ, नितीन सरकटे, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील,तहसीलदार राहूल गायकवाड, रावसाहेब आवचार, एम.डी.राठोड, निवास देशमुख, डिगांबर मुजमुले, विठ्ठलराव काळे,  निवास देशमुख, ज्ञानोबा आवचार रामकिसन आवचार रामराव गोरे, भीमराव भरर्गे संजय सहजराव, लक्ष्मण ज्ञानोबा मगर, अनिल राऊत, शंकर मोरे, परमेश्वर गोरे,  बाबुराव गोरे, सुदाम प्रधान, शेषराव गोरे, रामराव गोरे, रस्तुम कदम, डिगंबर मुजमुले, विठ्ठलराव काळे महादुअप्पा कापसे, नारायणराव कदम, उत्तमराव गोरे, बालासाहेब चिंचोलकर, रंगनाथराव आवचार, विठ्ठलराव कदम, लक्ष्मण आवचार, अच्चुतराव आवचार , सर्जेराव कदम, श्रीमती  झरे  आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असुन गावामध्ये असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.   विडोळी (खु) ते मंगरूळ रस्त्याचे मजबुतीकरण व डाबरीकरणं करणे त्यात ग्रामपंचlयंत आंतर्गत पाईप लाईन व इतर कामे मिळून एकून 01 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गावांच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायतींची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करुन ती तातडीने पूर्ण करण्यात यावीत. 
दळणवळणामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासाला शासनाने प्राधान्य दिले असुन जालना जिल्ह्यात रस्त्यांच्या कामासाठी 7 हजार कोटी रुपंयाचा निधी मंजूर करुन या निधीच्या माध्यमातुन संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत.  दोन हजार कोटी रुपये खर्चून शेगाव ते पंढरपूर या सिमेंट रस्त्याचे कामही वेगाने करण्यात येत असुन मतदारसंघातील 200 गावांमध्ये रस्त्याची कामे करण्यात येत आहेत.  येणाऱ्या काळात मतदारसंघातील एकही गाव पक्क्या व डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
जालना, परतूर व मंठा तालुक्यातील 176 गावांतील जनतेला शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपये खर्चून वॉटरग्रीड योजना करण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत अकराशे किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार असुन आतापर्यंत 450 किलोमीटरपर्यंत पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. शंभर गावामध्ये पाण्याच्या टाक्यांची कामे सुरु करण्यात आली असुन लवकरच  या योजनेचे काम पूर्ण होऊन नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यात वीजचे जाळे निर्माण करुन सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठयासाठी प्रयत्न करण्यात येत असुन जिल्ह्यात 33 के.व्ही. चे 49 उपकेंद्र मंजुर करण्यात आले असुन त्यापैकी 20 उपकेंद्रांची कामे सुरु करण्यात आली आहेत.  विडोळी, पाटोदा येथे 33 के.व्ही. मंजूर असुन केंधळी येथेही 33 के.व्ही.चे उपकेंद्र करण्यात येणार असुन त्यामुळे या भागातील जनतेला सुरळीतपणे वीज पुरवठा होणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यात अनेकविध मोठमोठे प्रकल्प उभारणीवर भर देण्यात येत असुन जालना येथे 200 एकर जागेवर रसायन तंत्रज्ञान महाविद्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे.  या महाविद्यालयाच्या माध्यमातुन जिल्ह्यासह मराठवाड्यातील गोरगरीबांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार असुन या माध्यमातुन त्यांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.  त्याचबरोबर जिल्ह्यात सीडस पार्कचीही उभारणी 110 एकर जागेवर करण्यात येणार असुन याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
सातत्याने निर्माण होणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करुन शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येत असुन जालना जिल्ह्यात या अभियांनातर्गत 200 कोटी रुपयांचा निधी खर्चून नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याबरोबरच 600 बंधाऱ्यांची उभारणी करुन  जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत.  या कामांध्ये महाजनट्रस्ट, नाम फाऊंडेशन या सेवाभावी संस्थांचीही मदत घेण्यात येत असुन येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री                      श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******

No comments:

Post a Comment