Tuesday, 18 May 2021

केंद्रशासनाची पेट्रोल, डिझेल व रासायनिक खते दरवाढ अन्यायकारक...नितीनकुमार जेथलिया

काँग्रेसच्या वतिने परतुर उपविभागीय अधीकारी यांना निवेदन सादर


मोसीन कुरेशी
परतुर:सत्तेचा व बहुमताचा गैरफायदा उचलत केंद्रातील शासन मनमानी कारभार करत एकप्रकारे सर्वसामान्यांचा व शेतक-याचा छळवत असून  दरवेळी होणारी पेट्रोल, डिझेल व अलीकडे रासायनिक खतांची दरवाढ करत केंद्राने कहरच केला असल्याचे  प्रतिपिादन काँग्रेसचे नितीनकुमार जेथलिया यांनी केले. याबाबत आज दिनांक 18 मे रोजी येथील उपविभागीय अधीकारी यांना काँग्रेसच्या वतिने केंद्रशासनाने  केलेल्या भाववाढीबाबत निवेदन सादर केले.यावेळी त्यांच्या समेवत यावेळी तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे, जि.प.सदस्य इद्रंजीत घनवट, पं.स.सदस्य बाजीरावजी खरात ,युवक अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे, उपनगराध्यक्ष सादेक भाई खतीब, नगरसेवक बाबुराव हिवाळे, अय्युबभाई कुरेशी राजेश भुजबळ, सिध्दार्थ बंड, तारेख भाई सिध्दीकी, अविनाश शहाणे, मधूकर झरेकर, गोविंदराव  वाशिंबे, उद्धव बोनगे ,मोसिन बागवान, पाडुरंग गाडगे , मतीन कुरेशी, विकास झरेकर,इंद्रजित डवले (सरपंच,लिंगसा)अप्पासाहेब खंदारे (सरपंच ,अंगलगाव)यांची उपस्थीती होती. यावेळी दिलेल्या निवेदनात केंद्रशासनाच्या  दरवाढीबद्धल रोश व्यक्त करतांना म्हणले की एकीकडे गरीबांना अधार देण्याची भाषा केद्र सरकार करत आहे व दुसरीकडे प्रत्येक महत्वाच्या दळणवळणाची भाववाढ करत सरकार सर्वसामान्याचा खिसा कापण्याचा काम करत असल्याचा आरोप केला. आता तर शेतकऱ्यांना  वेढीस धरत प्रत्येक रासायनिक खतांच्या थैलीमागे आठशे रूपये दर वाढवत सरकारने आपल्या आराजकतेची हद्द  ओलांडली असल्याचे निवदेनात नमुद करत सदरील दरवाढ माघे  घेण्याची मागणी निवेदनावर करण्यात आली आहे. याबाबत प्रसार माध्यमांशी प्रतिक्रीया व्यक्त करताना नितीनकुमार जेथलिया यांनी केद्र शासनाच्या धोरणाचा कडाडुन समाचर घेत खतांचे  भाव वाढवणारे हेच व कार्यकर्ते मात्र कृषी  कार्यालयात जात दरवाढी च्या पुढे बाजारात खतांची  विक्री होणार नाही अशी  मागणी करतात. एकप्रकारे देशातील शेतक-यांना व सामान्यांना दिशाभुल करण्याचा हा प्रकार असुन जनता इतकी मूर्ख नाही याचा जाब भविष्यात केंद्रातील  सत्ताधाऱ्यांना  द्यावा लागेल अशा भावना त्यांनी यावेळ व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment