Tuesday, 10 September 2019

तळणी येथील चाळीस ते पन्नास तरूणांचा काॅग्रेस मध्ये प्रवेश....कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माजी आ.सुरेशकुमार जेथलिया...

मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असुन जोरदार तयारी सर्वञच सुरू असल्याचे दिसुन येत आहे.म्हणुनच मंठा तालुक्यात काॅग्रेस पक्षाचे माजी.आमदार सुरेशकुमार जेथलिया याच्या माध्यमातुन जन संपर्क चालु असुन याचे औचित्य साधुन तळणी कराच्या वतीने जेथलिया यांचा फटाक्याची अतीषबाजी करत गावातुन मिरवणुक काढत हजारो नागरीकांच्या साक्षिने व मंगलसींग ठाकुर,रीतेश चंदेल ,रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात राजपुत गल्लितील मारोती मंदीरावर जवळपास चाळीस ते पन्नास नव तरूणांनी सुरेशकुमार जेथलिया यांच्या नेतृत्वावर विस्वास टाकुन त्यांच्या ऊपस्थितीत नवतरूणाचे स्वागत करून हा प्रवेस सोहळा काल दि.08 सप्टेबर रविवारी रोजी संध्याकाळी सपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमात जि.प.समाज कल्याण सभापती बनसोडे,प.स.सदस्य किसनराव मोरे,काॅग्रेस कमीटी मंठा ता.अध्यक्ष निळकंठराव वायाळ,बोराडे,अण्णा खंदारे,विनोद डोईफोडे,रामेश्वर कांगणे,महादेव माने,गौतम सदावर्ते,शीवाजी गुजर,अमोल सरकटे,जनार्धन आडळकर यांची प्रमुख ऊपस्थिती होती.यावेळी ऊपस्थित जनसमुदायांना बोलत असतांना सांगीतले की समस्या मिटवण्याबाबत भाजपा सरकार अपयशी ठरले असुन पाच वर्षे नुसत्या कोटीची विकास कामे केल्याच्या गप्पा मारत भाजपा सरकारने नागरिकांची दिशाभूल केली असून प्रत्यक्ष जनतेच्या खऱ्या समस्या सोडवण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचे प्रतिपादन मा.आ. सुरेश जेथलिया यांनी केले.यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जेथलिया यांनी भाजपा सरकारवर टीका करताना म्हटले की , खऱ्या समस्या ऐरणीवर ठेवत भाजपाने नागरिकांचे लक्ष दुसरीकडे भटकवण्याचा डाव रचण्याचा कुटील डाव आखला , यात कधी जातीवाद धोरण, तर कधी दादागिरीचे राजकारण यामुळे येथील सर्वसाधारण जनता भयभीत झाली आहे. पाच वर्षे यांनी केवळ जनतेला वेठीस धरण्याचे काम केले असून, शेतकरी, मजूर ,व्यापारी व सामान्य नागरिकांच्या कुठल्याच हितकारी योजना यांनी  प्रत्यक्ष राबवल्या नसल्याने  आज सर्वच अडचणीत सापडले असल्याचे ते म्हणाले काँग्रेस यापूर्वी  अनेक वर्षे सत्तेत राहिले मात्र काँग्रेसने कधीच भाजपा सारखे सुडाचे  राजकारण केले नाही , काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी मला साथ द्या  नागरिकांच्या प्रत्येक समस्यांबाबत मी नेहमी तत्पर राहुण,तालुक्यात पंचसूत्री कार्यक्रम राबवणार असून सिंचनावर जास्तीत जास्त भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले .या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी वचनबद्ध असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. व आज तरूणानी  जो माझ्यावर विस्वास ठेऊन पक्षात प्रवेश केला त्यांच्या विस्वासला तडा जाऊ देनार नसुन येनारा काळ आपलाच आहे   व मतदार भरभक्कमपणे माझ्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी त्यांनी सांगीतले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल सरकटे यांनी केले तर आभार रितेश चंदेल यांनी मानले
यावेळी गावातील नागरीक मोठ्यासंख्येने ऊपस्थित होते.
     

No comments:

Post a Comment