200

Followers

Thursday, 26 September 2019

व्यापारी महासंघ आयोजित बिझनेस सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मोसीन कुरेशी
मंठा ता.प्र:- व्यापारी महासंघ व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजक व व्यावसायिकांसाठी बिझनेस डेव्हलपमेंट सेमिनार मॅनेजमेंट गुरु राकेश जैन यांचे व्याख्यान येथील वैशाली मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. ता.(26)गुरुवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष भारतराव बोराडे, मंठा ता. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे, राजेश जैन,हस्तीमलजी बब, अशोकजी संचेती,सतिशराव निर्वंळ,कैलाशराव बोराडे, संजय छल्लाणी, प्रा.भारत खंदारे,दत्तराव निर्वळ, संतोष शहाणे, मोहन अग्रवाल, राधाकिशन बोराडे, शिवाजीराव सुरवसे, राधेश्याम बिर्याणी, मनोज राठी, अमोल काला, शिवाजी आकमार, डॉ. सदाशिव कमळकर,विजय सराफ, दीपक बोराडे, विजय बोराडे, यांच्यासह शहरातील व्यापारी प्रतिष्ठित नागरिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींची उपस्थिती होती. या प्रसंगी मॅनेजमेंट गुरु राकेश जैन यांनी आपल्या व्याख्यानात आजच्या काळातील व्यापारातील आव्हाने त्यावर काढावयाचा मार्ग. तसेच आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाचा व्यापारामध्ये होत असलेला वापर या बाबत जनजागृती, व्यवसायात टिकायचे असेल तर येणाऱ्या काळानुसार बदलणे किती गरजेचे आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट केले. आज स्मार्टफोनच्या युगामध्ये मोबाईल ॲप्स तयार करून अनेक कंपन्या लाखोंचा नफा कमी होत आहे. सोबतच ग्राहकांना आकर्षित करून सर्व सुख सुविधा देण्याचे काम करत आहेत. ऑनलाइनच्या या व्यवहारामुळे ट्रॅडिशनल (परंपरागत) मार्केटवर परिणाम होत असून मंदी आली आहे. वास्तविक व्यापारामध्ये आजही मंदी नसून ऑनलाइन मार्केट मुळे या समस्यांना व्यापाऱ्यांना समोर जावे लागत आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी बदलत्या काळानुसार आपल्या व्यवसाय बदल केले पाहिजेत. सेल वाढण्यापेक्षा आपली व्यवसायाची व्हॅल्यू कशी वाढेल हे पाहणे आजच्या दृष्टीने गरजेचे आहे. यासाठी नवयुवकविद्यार्थ्यांना व व्यापाऱ्यांना टेक्निकल ज्ञान घेणे गरजेचे असल्याचे शेवटी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दुबाले सर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ पांडुरंग नवल यांनी केले.

No comments:

Post a Comment