Tuesday, 17 September 2019

तडजोड स्वीकारल्याने संसार फुलतो --न्या. शर्मा

मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : आनंदी जीवनासाठी तडजोड आवश्यक असून तडजोड स्वीकारल्याने संसार फुलतो आणि सुखासमाधानाने जीवन जगता येते असे प्रतिपादन न्या. शर्मा यांनी केले. मंठा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार ता. 14 रोजी कायदेविषयक लोक न्यायालयात न्या. शर्मा यांनी दोन अर्जदारांना गैरअर्जदार सोबत समेट घडवून आणला व अर्जदारांना त्यांच्या सासरी नोंदविण्यास पाठविले .यावेळी न्या. शर्मा बोलत होते. जीवनाला सुखी आणि समाधानी करण्याचा एकमेव मार्ग तडजोड हा असून संसारामध्ये सुद्धा तडजोड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी लोक न्यायालयात 28 प्रकरणे निकाली काढून 7 लाख 3 हजार 500 रुपये वसुली झाली. यावेळी पॅनल प्रमुख म्हणून न्या. शर्मा तर सदस्य म्हणून ॲड डी एस निंबाळकर, ॲड आर बी गडदे उपस्थित होते .याप्रसंगी ॲड पी डी चव्हाण, अॅड ए आर देशपांडे, अॅड व्ही आर वायाळ ॲड ए व्ही वायाळ, ॲड एस आर झोल ,अॅड एम एस मोरे, अॅड मोगल,  अॅड वेव्हल , अॅड राठोड, अॅड अवसरमोल,अॅड हेलसकर, ॲड लिंबुळकर,अॅड जाधव,  ॲड कुलकर्णी,अॅड राठोड तसेच न्यायालयीन अधीक्षक श्री जोशी कर्मचारी वेळीकर ,पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टू वार ,पो हे कॉ डांगरे पो कॉ चव्हाण इतर न्यायालयीन कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते

No comments:

Post a Comment