मोसीन कुरेशी
मंठा /प्रतिनिधी : शेतकऱ्यांचा विरोध असतानाही लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे मृतसाठ्यातून पाणी कमी झाले असून शहरात भीषण पाणीटंचाईचे सावट लक्षात घेता शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना सोबत घेऊन आज सोमवार ता 3 रोजी प्रकल्पाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन धरणातील पाण्यापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत चारी खोदण्याचे आदेश दिले. या कामाला पोकलेनद्वारे तात्काळ सुरुवात झाल्यामुळे शहरातील जनतेला दिलासा मिळाला आहे .शहरातील नागरिकांना पाणी कमी पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पातील पाण्यावर मंठा -परतूर तालुक्यातील जवळपास वीस ते बावीस गावातील शेतकरी अवलंबून आहेत पाणी सोडण्याला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे ऊस केळी भाजीपाला व फळ बागांचे नुकसान झाले आहे ,याबद्दल जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यांनी यासंदर्भात धरणाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, पाणी सोडल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तसेच मंठा शहरातील जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार होते त्यातच मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण असल्यामुळे जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी भर उन्हात नगराध्यक्ष नितीन राठोड, बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे,शिवसेना तालुकाप्रमुख अवचार, उपनगराध्यक्ष सिराजखान पठाण, नगरसेवक बालासाहेब बोराडे,मुसाभाई कुरेशी, अचीत नाना बोराडे, नीरज सोमानी, तालुका संघटक तुळशीराम कोहीरे यांना सोबत घेऊन धरणातील पाण्याची पाहणी केली व चारी खोदण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली त्यामुळे आता मंठेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही तरी पाणी जपून वापरावे असे आवाहन जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी केले यावेळी नागेश सराफ ,संदीप आवचार, महादेव अवचार, शिवाजीराव अवचार ,दिलीप अवचार, विठ्ठलराव अवचार यांच्यासह नगरपंचायतच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते
मंठा /प्रतिनिधी : शेतकऱ्यांचा विरोध असतानाही लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे मृतसाठ्यातून पाणी कमी झाले असून शहरात भीषण पाणीटंचाईचे सावट लक्षात घेता शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांना सोबत घेऊन आज सोमवार ता 3 रोजी प्रकल्पाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन धरणातील पाण्यापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत चारी खोदण्याचे आदेश दिले. या कामाला पोकलेनद्वारे तात्काळ सुरुवात झाल्यामुळे शहरातील जनतेला दिलासा मिळाला आहे .शहरातील नागरिकांना पाणी कमी पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पातील पाण्यावर मंठा -परतूर तालुक्यातील जवळपास वीस ते बावीस गावातील शेतकरी अवलंबून आहेत पाणी सोडण्याला शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे ऊस केळी भाजीपाला व फळ बागांचे नुकसान झाले आहे ,याबद्दल जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यांनी यासंदर्भात धरणाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, पाणी सोडल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तसेच मंठा शहरातील जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार होते त्यातच मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण असल्यामुळे जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी भर उन्हात नगराध्यक्ष नितीन राठोड, बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे,शिवसेना तालुकाप्रमुख अवचार, उपनगराध्यक्ष सिराजखान पठाण, नगरसेवक बालासाहेब बोराडे,मुसाभाई कुरेशी, अचीत नाना बोराडे, नीरज सोमानी, तालुका संघटक तुळशीराम कोहीरे यांना सोबत घेऊन धरणातील पाण्याची पाहणी केली व चारी खोदण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली त्यामुळे आता मंठेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही तरी पाणी जपून वापरावे असे आवाहन जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी केले यावेळी नागेश सराफ ,संदीप आवचार, महादेव अवचार, शिवाजीराव अवचार ,दिलीप अवचार, विठ्ठलराव अवचार यांच्यासह नगरपंचायतच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते

No comments:
Post a Comment