मंठा प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न देण्याची मागणी मंठा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले की सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सत्तेच्या स्वार्थासाठी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे.जातीवादी चे राजकारण करीत आहे.व शांत महाराष्ट्र राज्याला पेटविण्याचे काम करीत आहे. मुंबई येथिल सभेत त्यांनी मुस्लिम समाजाच्या मस्जिद वरील भोंग्याबबात व अजान बाबत नवा वाद निर्माण करुन सभेत प्रक्षोभक भाषण करुन हिंदु मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.व समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या आहे. राज ठाकरे भर सभेत मुस्लीम समाजाच्या विरोधात चिथावणी खोर भाषण खुले आम करीत आहे. व पवित्र अजानच्या विरोधात मस्जिदीसमोर भोंगे लावुन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याची धमकी देत आहे.त्यामुळे हिंदु मुस्लीम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करुन महाराष्ट्रात हिंदु-मुस्लीम समाजामध्ये जातीय दंगल लावण्याचे काम करीत आहे.तरीही महाराष्ट सरकार कडुन व महाराष्ट्र पोलीस कडुन राज ठाकरे वर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.असे का? तर 1 में रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न द्यावी नसता मराठवाडा व महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, निवेदनावर सय्यद रफिक, मोसीन कुरेशी,प्रदीप मोरे,एजाज भाई, लखन कांबळे, लायक कुरेशी,बंडू बोराडे, मुस्ताक कुरेशी,ताहेर बागवान,भगवान शिंदे,यांचे स्वाक्षऱ्या होते.
Tuesday, 26 April 2022
Thursday, 7 April 2022
पवित्र रमजान महिन्यात विजेचा लपंडाव थांबविण्याची मागणी....
हजरत टिपू सुलतान युवा मंचतर्फे महावितरण कार्यालय येथे निवेदन देण्यात आले...
मोसीन कुरेशी
मंठा प्रतिनिधी: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना 3 एप्रिल रविवार पासून सुरू झाला असून सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे घराच्या बाहेर पळणे म्हणजे जीवाला धोका करून घेणे आहे.उन्हाळा असल्यामुळे देखील सतत उकाडा होत आहे. आणि अशा परिस्थितीत महावितरण कार्यालय मार्फत नियमित व सुरळीत विद्युत पुरवठा एवजी रमजान महिना लागल्यापासून मागील चार ते पाच दिवसांपासून सतत विद्युत पुरवठा तासनतास खंडित होत. असल्यामुळे
हजरत टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने महावितरण कार्यालय येथे कनिष्ठ अभियंता अनिल जंगम साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा उपवास ठेवून घरीच विश्रांति करतात परंतु सतत विजेचा लपंडाव होत असल्याने उपवास रोजा करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या बंधू-भगिनींना अनेक अडचणींस समोरे जावे लागत आहे जे नागरिक वयोवृद्ध आहे. त्यांना सतत पंखा किंवा कुलर चालू केल्या शिवाय जमत नाही परंतु सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे ते शक्य होत नाही. तरी रमजान महिना व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन विजेचा लपंडाव थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. नसता टिपू सुलतान युवा मंच तर्फे महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोसीन कुरेशी यांनी दिला आहे. याप्रसंगी निवेदनावर टिपू सुलतान युवा मंच तालुकाध्यक्ष मोसीन कुरेशी,नगरसेवक उबेद बागवान,इस्माईल राज,इम्रान मनियार,अब्दुल्ला बागवान,इद्रीस कुरेशी,इम्रान तांबोली,सिराज कुरेशी,जाविद पिंजरी,साजिद पिंजरी,जाविद डी.के शारुख अतार,वसीम शेख,मोइस तांबोली,जाकेर कुरेशी,इनुस कुरेशी यांचे स्वाक्षऱ्या होते.